शिक्षकांने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन आत्महत्या !

Spread the love

माजलगाव : तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले. आज मंगळवारी (दि.१४) सकाळी ९:३० वाजता आसरडोह ( ता.धारुर ) येथील त्या शिक्षकांने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली. घटनास्थळी आडस पोलीस चौकीचे सिद्धेश्वर सचिन धाव घेतली आहे.

धारुर तालुक्यातील कासारी बोडखा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले नितीन लक्ष्मण पाटुळे रा.आसरडोह (ता.धारुर) यांनी आज मंगळवारी सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडले. यानंतर काही वेळाने गावच्या पुर्वेस घरापासून काही अंतरावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती ग्रामस्थांना माहिती समजताच पुर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती पोलीसांना देताच आडस चौकीचे पोलीस कॉ.सिध्देश्वर सचिन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी धारुर येथील सरकारी दवाखान्यात पाठवून दिला, मात्र आत्महत्या का केली याबाबत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयताच्या पश्चात आई – वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने आसरडोह येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply